➡️भारतात किती अभिजात भाषा आहेत?
▶️तामिळ, तेलगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या भारतातील सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला होता.
⭕️ मराठी,पाली, बंगाली, आसामी , प्राकृत आज या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
⭕️ 11 अभिजात भाषा झाल्या आहेत.
⭕️ अभिजात भाषा - केंद्र सरकारचे निकष :
अभिजात भाषा हा वैशिष्ट्यपूर्ण भाषेला भारत सरकारद्वारे दिला जाणारा एक दर्जा आहे. केंद्र सरकारने अभिजात भाषेचे निकष खालिलप्रमाणे ठरवलेले आहेत:
- भाषा प्राचीन आणि साहित्यश्रेष्ठ असावी.
- भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे.
- भाषेला स्वतःचे स्वयंभूपण असावे.
- प्राचीन भाषा आणि तिचे आधुनिक रूप यांचा गाभा कायम असावा.
हा दर्जा ज्या भाषांना दिला जातो, त्या भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारकडून त्या-त्या राज्याला भरीव अनुदान मिळते.
⭕️ मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली :
➡️मराठीला अभिजात दर्जा मिळावा याकरता हालचाली सुरु झाल्या आणि प्रा. रंगनाथ पठारे समितीची स्थापना झाली.
➡️ मराठी भाषेतील ग्रंथधनाचे पुरावे बाराव्या–तेराव्या शतकापासून आढळतात. ‘लीळाचरित्र’, ‘ज्ञानेश्वरी’, ‘विवेकसिंधू’ यांसारख्या ग्रंथांचा आधार दाखविला जातो.
◾️ अभिजात दर्जाचे फायदे:
“अभिजात दर्जा” मराठीच्या सर्व चळवळींसाठी फार मोठा उत्प्रेरक अर्थात कॅट्यालिस्ट म्हणून काम करू शकतो. अभिजात दर्जाचे भाषा संवर्धनासाठी पुढीलप्रमाणे फायदे आहेत:
- मराठीच्या बोलींचा अभ्यास, संशोधन, साहित्यसंग्रह करणे इ.
- भारतातील सर्व ४५० विद्यापीठांमध्ये मराठी शिकवण्याची सोय करणे.
- प्राचीन ग्रंथ अनुवादित करणे.
- महाराष्ट्रातील सर्व १२००० ग्रंथालयांना सशक्त करणे.
- मराठीच्या उत्कर्षासाठी काम करणाऱ्या संस्था, व्यक्ती, विद्यार्थी अशा साऱ्यांना भरीव मदत करणे इ.
⭕️ यापूर्वी भारतात 6 भाषांना अभिजात दर्जा दिलेला होता.
1 तामिळ (2004),
2 संस्कृत (2005),
3 कन्नड (2008),
4 तेलुगु (2008),
5 मल्याळम (2013)
6 ओडिया (2014)
7 👉मराठी=2024
8 👉आसामी=2024
9 👉पाली=2024
10 👉 पाकृत=2024
11 👉बंगाली =2024
👉या नवीन पाच भाषांना अभिजीत भाषेचा दर्जा भेटला